‘माऊथ फ्रेशनर’ या संग्रहातील कविता व्यथा, वेदना आणि अस्वस्थेच्या कविता आहेत. भारतीय संविधान, लोकशाही समाजवादी विचारधारा ही कवीची वैचारिक भूमिका आहे. याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये दिसते!

आपल्या देशातील संमिश्र संस्कृती, गंगा-जमुनी तहजीब आणि सहिष्णूतेचा वारसा नष्ट करण्याचे षडयंत्र सांप्रदायिक शक्तींनी गेल्या काही वर्षांमध्ये नियोजनपूर्वक रचले आहे. या संकुचित राष्ट्रवादाच्या राजकारणाला काही प्रमाणात यशही मिळते आहे. याची जाणीव या कवीला आहे. द्वेष, दुहीच्या या राजकारणाचा त्यांना त्रास होतो आहे. ही चिंता कवीने सहज, साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये विविध कवितांमधून व्यक्त केलेली आहे.......